Posts

चला जाऊ गडकिल्ल्यांवर, महिमान गड,ता मान जि सातारा

*चला जाऊया गड-किल्ल्यांवर*  (*महिमान गड*,ता.मान,जि सातारा)              (भाग-०१) 🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩 *************************** ... नानाभाऊ माळी                 प्राचीन काळापासून आपला देश संपूर्ण विश्वाला शतकोंशतकं सहनशीलतेचा, मानवतेचा, शांतीचा संदेश देणारा महान संस्कृतीचां आदर्श दर्शक देश आहे.जगात शांती, मानवता नांदावी म्हणून भरत भूमीने जगाला सतशीलतेचा महान विचार दिला,मंत्र दिला आहे.अनेक आक्रमक या सोनेरी भूमीत आले.मानवतेचा महान संदेश धुडकावून संस्कृती नष्ट करण्यासाठी मंदिरं, तत्कालीन किल्ले तोड फोड करीत भरत भूमीची लयलूट करीत राहिले.त्यांच्या चालीरिती,संस्कारांची भारतीय संस्कृतीशी तिळमात्र साम्यता नव्हती.आपण मानवतेचे पुजारी बनून आक्रमकांना सहन करीत राहिलो.ते येऊन लयंलूट करीत राहिले.नरसंहार करीत राहिले. महिलांवरती अत्याचार करीत राहिले.येथील संस्कृती भ्रष्ट करीत राहिलें.भारतीय विशालता महानतेला हादरे देत यवनी सत्ता रुजवत राहिलें.                       ...

तिरुपती बालाजी दर्शन(देव गाभाऱ्यात उभा )

*तिरुपती बालाजी दर्शन*     (*देव गाभाऱ्यात उभा*)              (भाग -०४)     💐💐🌹🙏🌹💐💐 *********************** ... नानाभाऊ माळी            जीवनात प्लॅनिंग,नियोजन अतिशय महत्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीत उत्तम नियोजन असल्यासं रिझल्ट उत्तम मिळत असतो.थोडंसं दुर्लक्ष देखील कष्टमय परिणाम देत असतात.आपण घरून यात्रेला, तीर्थस्थानाला,लांबच्या प्रवासाला जातो.निघाल्यापासून परत येईपर्यंतचं नियोजन केलेलं असतं.  कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घेतो. कुठे थांबायचं?पुढील प्रवास कसा याची जानकरांकडून किंवा माहिती काढून करून घेतल्यावर त्रास कमी होतो.कधी अति आत्मविश्वास देखील त्रासदायक ठरू शकतो.त्या भागाची माहिती नसेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचं साह्य घेऊ शकतो. सोबत काय काय वस्तू असावी. कुठली नसावी, सारासार विचार करून नवख्या ठिकाणी जाणं योग्य असतं.            आम्ही तिरुपती बालाजीला ६ डिसेंबर २०२५ रोजी पुण्याहून रेल्वेने गेलो होतो. देव दर्शन झालं.श्रद्धा देवचरणी वाहून आलो. पण आम्ही नवख्या ...

तिरुपती बालाजी दर्शन.. देव गाभाऱ्यात उभा

*तिरुपती बालाजी दर्शन* (*देव गाभाऱ्यात उभा*)             (भाग -०३) 🌹🌹💐🙏💐🌹🌹 *********************** ...नानाभाऊ माळी    एखादं लहान मुलं यात्रेत हरवावं!आई वडील मुलासाठी सैर भैर होतात.तें मूल देखील गर्दीच्या महापुरात आपलं कोणी दिसत नसल्याने हमसून हमसून रडून कुठंतरी एका जागी बसून आपल्या माणसांच्या भेटीसाठी कासावीस झालेलं असतं. आपलं कोणी भेटत नाही. इतर ओळखीचे दिसत नाहीत.मलूल झालेल्या चेहऱ्याने कोपऱ्यात बसलेलं तें मूल हंबरडा फोडून फोडून थकतं. कुठेतरी देव नामाचा चमत्कार आशेला उभा असतो.अशा पल्लवीत होत असते!आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो.लहान मोठे एकूण ५४ जन होतो.देव दर्शनाला गेलो. दर्शन रांगेतून चालतांना मोबाईल सोबत नेल्यामुळे भक्तांच्या महापुरात मोबाईल जमा करण्याच्या नादात, गर्दीच्या रेट्यात सर्व मागे पुढे झालो होतो.दर्शन रांगेत पाण्याचा प्रचंड लोंढा सुटावा तसें श्रद्धाळू पुढे ढकलतं चालत होती.साक्षात्कारी परमेश्वर भक्तांचा पालनहार असतो.              ५४ व्यक्ती दर्शनार्थी होतो. काहींच्या हाती जेष्ठ नागरिकांसाठी व...

*तिरुपती बालाजी दर्शन*(*देव गाभाऱ्यात उभा*) (भाग-०२)🌹🌹💐🙏💐🌹🌹***********************... नानाभाऊ माळी माणसांचा अलोट श्रद्धामहापूर देवळात लोटल्यावर देव गाभारा फुलून जातो.भक्ती समागम एकरूप होतो,एकजीव होतो!भक्तीचं मनोमिलन होतं.आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो.तिथे फक्त ईश्वरदर्शन असतं.परमेश्वराचं अतिविशाल लोहचुंबक असतं.बाळ आईच्या कुशीत अलगद बसावा.सुरक्षित अनुभव घेत राहावा. तसाचं ईश्वरास शरण गेलेला भक्त देवकुशीत बसून स्वतःस सुरक्षित समजू लागतो. देवदर्शाने,तृप्तीनें,समाधानांने नाचू लागतो.ईश्वर ओढ वेगळीचं अनुभूती असते.लाखो भक्त ईश्वर कृपेसाठी व्याकुळ असतात.तळमळत असतात.देव भक्तीचा भुकेला असतो, असं म्हणतात. आम्ही देखील करोडो भक्तांची श्रद्धा असणाऱ्या तिरुपती बालाजीला गेलो होतो.पुण्याहून साधारणत: १००० किलोमीटर अंतर रेल्वेनें पार करून दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या कुडकूडणाऱ्या थंडीत दर्शन रांगेत होतो. आम्ही ५४ जन होतो पण दर्शन रांगेत सर्वचं विखूरले गेलो होतो. त्याविषयी अनुभव कथन!.......... तिरुपती रेल्वे स्टेशनापासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर, अति उंच डोंगरावर श्रीतिरुमाला बालाजीचं अतिभव्य प्राचीन मंदिर आहे.उंच डोंगरावर अतिभव्य शहर वसले आहे!भक्तांच्या निवासासाठी, डोंगरावर सात ते आठ अतिभव्य भक्तनिवास बांधलेले आहेत!एका भक्तनिवासात साधारण तीन ते चार हजार व्यक्ती राहू शकतात!लाईट, पाणी, वॉशरूम, लॉकर, नाश्ता, दुपार-संध्याकाळचं जेवण, केसकर्तनालय!सर्वचं मोफत...असे सात-आठ भक्तनिवास आहेत.दररोज लाखो भक्त दर्शनाला येत असतात. मंदिरातं दर्शनाला आलेल्या भक्तांसाठी मोफत इलेक्ट्रिक बसची सुविधा होती!आम्ही कुडकूडत्या थंडीत PS-5 भागातील 'वेंकटेश निलायम' भक्तनिवासात पोहचलो होतो.७ डिसेंबरला लॉकरची चावी घेतली. सर्व सामान लॉकरमध्ये ठेवलं.तेथेचं जेवण आटोपून घेतलं.रात्री 'व्यंकटेश निलायमध्येचं' झोपलो.दुसऱ्या दिवशी सकाळी ०८ डिसेंबरला अंघोळी करून बाहेर पडलो.भाड्याने गाड्या करून त्या भव्य उंच डोंगरावरील छोटे मोठे पर्यटन स्थळ अन मंदिर पाहाण्यात दंग होतो.जिकडे पाहावे तिकडे भक्तजन दिसत होते!दिवसभर फिरून झाल्यावर पुन्हा भोजन गृहात जेवण उरकले.श्रीबालाजीचं अतिविशाल मंदिरं डोंगर उंचावर वसले आहे.थंडीचा कडका जाणवत होता.आम्ही देवस्थानांने दिलेल्या वेळेतील स्लॉटप्रमाणे संध्याकाळी ०४ वाजता दर्शन रांगेत उभे होतो. दर्शनाला आलेल्या भक्तांची प्रचंड गर्दी होती. 'गोविंदा!.. गोविंदा!..' असं श्री व्यंकटेशाचं एकमुखी नाम घेत... भक्तजन भक्तीच्या सागरात दर्शन रांगेने पुढे सरकत होती.आमच्या सोबत असलेल्या काही जेष्ठ नागरिकांसाठी विशेष पास देण्यात आल्या होत्या.ते वेगळ्या मार्गाने निघून गेले.राहिलेले इतर सर्व जन काही किलोमीटरच्या दर्शन रांगेने पुढे सरकत होती.माणसाला श्रद्धा अन आस्था जगण्याची उमेद देत असतात. श्वासात प्राण तरंगत असतो. कोंडमारा होऊ नये म्हणून दर्शन संजीवनीच महान कार्य करीत असतं!आम्ही श्रीबालाजी दर्शनाला गेलो होतो. देव दर्शनाची अभिलाषा घेऊन 'श्रीगोविंदा... गोविंदा' गजर करीत दर्शन बारीने पुढे सरकत होत दर्शन रांगेने पुढे सरकत होतो. मध्येच... विमान तळावर मेटल डिटेक्टर चेकिंग मशीन असतं तसंच मेटल डिटेक्टर चेकिंग मशीन मधून जावं लागलं.ज्यांच्याकडे मोबाईल, छोटया मोठया टाचण्या, पिना असतील ते सर्वजन अडकले.इतर सर्व भक्तजन दर्शनरांगेने पुढे निघून गेले.मोबाईल जमा करायला दूरवर वेगळंचं ठिकाण होतं.आमच्यासोबत असलेल्या ८०% व्यक्तींकडे मोबाईल होते.आम्ही पहिल्यांदाचं गेलो होतो. कुठल्या कुठल्या वस्तू सोबत असाव्यात हे माहीत नव्हतं. भक्तीचा अलोट सागर लोटला होता.त्यात आम्ही ५४ व्यक्ती दर्शन रांगेत पूर्णतः विस्कळीत झालो होतो.मागे पुढे कुठंतरी होतो.संपूर्ण भारतातून आलेले विविध भाषिक, प्रांतिक दर्शन रांगेत पुढे सरकत होती.मुखी एकच गजर होता,'गोविंदा...गोविंदा!' आम्ही त्या लाखों भक्तांच्या महापुरात इकडे तिकडे विखूरले गेलो होतो. संध्याकाळी ०४ वाजेपासून रांगेत होतो. रात्र झाली होती.अंगाला थंडीचा कडाका झोबंत होता.मोबाईल जमा करून पुन्हा रांगेत आलेले सर्व मागे राहिले होते.काहीजण जेष्ठ नागरिकांच्या रांगेने दर्शनाला गेले होते.मोबाईल जमा केलेला होता.लॉकरचं ठिकाण कुठे ते कळत नव्हतं.मोबाईल नसल्याने संपर्क खंडित झाला होता.दर्शन रांग खूप मोठी होती.मुखात,'गोविंदा.. गोविंदा' होता.श्रीव्यंकटेश बालाजी आतून हिम्मत देत होता.(अपूर्ण लेख पुढील-०३ऱ्या भागात पाहू)🌹🌹🙏💐🙏💐🌹🌹***************************... नानाभाऊ माळीहडपसर, पुणे-४११०२८मो.नं-९९२३०७६५००दिनांक-२० डिसेंबर २०२५nanabhaumali.blogspot.com

*तिरुपती बालाजी दर्शन* (*देव गाभाऱ्यात उभा*)               (भाग-०२) 🌹🌹💐🙏💐🌹🌹 *********************** ... नानाभाऊ माळी         माणसांचा अलोट श्रद्धामहापूर देवळात लोटल्यावर देव गाभारा फुलून जातो.भक्ती समागम एकरूप होतो,एकजीव होतो!भक्तीचं मनोमिलन होतं.आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो.तिथे फक्त ईश्वरदर्शन असतं.परमेश्वराचं अतिविशाल लोहचुंबक असतं.बाळ आईच्या कुशीत अलगद बसावा.सुरक्षित अनुभव घेत राहावा. तसाचं ईश्वरास शरण गेलेला भक्त देवकुशीत बसून स्वतःस सुरक्षित समजू लागतो. देवदर्शाने,तृप्तीनें,समाधानांने नाचू लागतो.ईश्वर ओढ वेगळीचं अनुभूती असते.लाखो भक्त ईश्वर कृपेसाठी व्याकुळ असतात.तळमळत असतात.देव भक्तीचा भुकेला असतो, असं म्हणतात. आम्ही देखील करोडो भक्तांची श्रद्धा असणाऱ्या तिरुपती बालाजीला गेलो होतो.पुण्याहून साधारणत: १००० किलोमीटर अंतर रेल्वेनें पार करून दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या कुडकूडणाऱ्या थंडीत दर्शन रांगेत होतो. आम्ही ५४ जन होतो पण दर्शन रांगेत सर्वचं विखूरले गेलो होतो. त्याविषयी अनुभव कथन!..........   ...

तिरुपती बालाजी, कष्टाचा

*तिरुपती बालाजी दर्शन*            *(कष्टाचां देव )* 🌹🌹💐🙏💐🌹🌹 ********************** ... नानाभाऊ माळी मन वढाय वढाय  दूर पळतं बाहेर.. पाय पडती रें पुढे कधी भेटेल माहेर!🌹 पाय पडती रें पुढे देव उभा दूर दूर  घाम कष्टातुनी सार  उघडें आनंदी द्वार!🌹 श्रद्धा हृदयांत वसें डोळे शोधती कळस माझ्या अंतरीचा देव दूर पळतो आळस!🌹 मन वढाय वढाय कसं होई ना रें शांत चालून थकून भागलो 'तो' सापडेना कांत!🌹 रोज चालतो चालतो  शोध लागे ना अजून  सूर्य तळपतो वरुन  देह निघाला भाजून!🌹                       आपण मन शांतीच्या पाठीमागे लागलो आहोत.दररोज तिला शोधतो आहोत.ती पुढे पळते आहे.आपण पाठलाग करीत आहोत.चित्तास समाधान लाभतं नाही.आपण प्रवासी होतो. यात्री होतो. आपण कोण? कुठे चाललो? का चाललो? आपला जन्म का झाला? झालाचं आहे तर जगणं कोणासाठी?कशासाठी? इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असणारे आपण, बुद्धी, वाचामुळे आपलाचं शोध सुरु ठेवून कष्ट, त्याग, झिजण्यातून परोपकारी होत जातो.ओरबाडून खाणारी हीन वृत्ती सोडून सुखाच्...

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

सोनं सोडी पित्तयंमांगे पयी ऱ्हायनात 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *************************** ... नानाभाऊ माळी                गाड्या पयी ऱ्हायन्यात!मोट्रा पयी ऱ्हायन्यात!मानसे पयी ऱ्हायनात!बठ्ठ जग पयी ऱ्हायन!पयनं काय थांबेलं नयी से!थांबावू भी नयी!पयल्हे पयानी गती धिमे व्हती!मानसे चांगला व्हतात!येरायेरलें धरी संगे मांगे लयी चाली ऱ्हायंतात!तव्हयं मव्हरे जायी जग जिकानं हाव्हरं नयी व्हतं!यांनं कुस्मरं त्यांनंघर जाये!त्यान्हा खाराम्हानं लोनचं यांन्हा जीभवर पघयेतं ऱ्हायें!सासुले सासुले येरायेर संगे मांघे निंघी जायेत!🌹    जश्या काय बदलालें लाग्ना!उज्जी हावरं सुटनं!मानुस्की कुचमालं व्हवालें लाग्नी!मव्हरे जावानी हुडी वर-दुडी मांगे लाग्नी!...तठे मानोस कूचमालं व्हयी ग्या!तठे मानोस मानुसकी सोडी पैसास्नी गड्डीवरं बठी ग्या!मानोस्कीना हुंडूक दाबायी ग्या!येरायेरनीं कुडची-चड्डी धोतर व्हडी व्हडी मांगे ढकलाले लाग्नातं!सोता खोया खोसी पयालें लाग्नातं!हावरं मांगे लाग्न!पैसा नावनां उचकेलं डंग्रा खिसाम्हा जायी बठना!खिसा फुगी फुगी,छाती फुगालें लाग्नी!फुगऱ्यास्ना पाह्यरें सत...

दर्शन.. संतुष्टीचा प्रसाद

दर्शन.. संतुष्टीचा प्रसाद 🚩🚩🚩🚩🚩🚩 ****************** ... नानाभाऊ माळी          हृदयाचे ठोके पडत असतात!धडकन चालूच असतें!श्वसन चालूचं असतं!नाका तोंडातून श्वास सुरूचं असतात!बाहेरून बंदिस्त छातीच्या आतचीं धमणी अविरत सुरूचं असते!देहातला होम अखंडपणे सुरूचं असतो!ओमंकार स्वरूपाचं स्पंदन सुरूचं असतं!मानवी देह पावित्र्याचं सुंदर गुंजन असतं!आपला देह होम झाला तर ? देह दाह सहन करीत चंदणी लाकडाचा सुगंधी देह स्वाहा होत असतांना आपला जन्म सिद्ध करीत राहतं!आपला देह मुळातचं परमात्म्यास अर्पण करण्यासाठी असतो!आत्मा समर्पित भावनेने जगत असतो!जागत असतो!समर्पण सेवावृत्ती होऊन बसते!... अशाचं परमात्म्याच्या विशाल स्वरूपाचं दर्शन करण्या गेलो होतो!💐    सातारा जिल्ह्यातल्या 'वाई' पासून काही किलोमीटर अंतरावर,'ढोम' धरणाच्या पोटाशीच पवित्र कृष्णा नदी तिरावर महादेवाचं प्राचीन मंदिर आहे!नृसिंहाच प्राचीन मंदिरं आहे आहे!निसर्गाच्या कुशीत, धरणाच्या विशाल साठ्याजवळी असलेलं प्राचीन मंदिरं स्वर्ग सुखाचं द्वार आहे असं वाटून गेलं होतं!आम्ही दिनांक ०९ जून २०२४ रविवार रोजी 'चला जाऊ गड-किल्ल...