Posts

सौ. स्मिता दिदी, प्राचार्य रवींद्र वाघ सर २५ व्या विवाह दिनाच्या शुभेच्छा.

*सौ.स्मिता दिदी-प्राचार्य रवींद्रजी वाघ सर* (*२५ व्या लग्नदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!*) 🌹💐💐🍫🎂🍫💐💐🌹 ***************************** ...नानाभाऊ माळी आज २५ जून!निर्जला एकादशी विठ्ठलरूप दर्शनाचां पवित्र दिवस.आज गुरुदत्तांचा वार गुरुवार आहे.२५ संख्येची फोड वेगवेगळ्या दृष्टिकोनातून करता येईल. सकारात्मक श्रद्धेतून २५चां सुंदर मुखडा सजवता येतो.२+५ बेरीज केल्यास ०७ होतात.अंक शास्रानुसार ०७ अंक अतिशय शूभ मानला जातो.शुभांकरं शुद्ध श्रद्धेचं प्रतीक असतं.दोनावर पाच २५ होतात.ही संख्या अलौकिक,अगम्य, चमत्कारीक वाटते.ही संख्या नवनवीन चमत्कार दाखवते.२५ संख्या वैभव,संपन्नता अन यशस्वीतेचं प्रतीक असतं. उंच शिखराचीं पहिली पायरी मानली जाते.सळसळत्या तारुण्याचं प्रतीक मानलं जातं.वर्षांचां विचार केल्यासं २५ वर्षांची कारकीर्द  नवचैतन्य देतं असते.ऐन पंचवीशीतीलं व्यक्ती अनेक स्वप्न पाहणारी असते.मग ज्यांचं जवळपास पंचवीशीतील सळसळत्या तारुण्यात,वयात लग्न झालं अन त्यासं २५ वर्षं पूर्ण झाली आहेत त्याला काय म्हणावं?   *लग्नाचं पंचवीसावं वर्षं.* अजून कसं स्पष्टीकरण देऊ शकतो. *लग्नाचं रौप्यमहोत...

भुंजायेल ढेकाया देखत लगीनले गवू

*भुंजायेल ढेकाया देखत लगीनल्हे गवू* 🌞🌞🌞🌝🌝🌞🌞🌞 *************************** ... नानाभाऊ माळी                        काल्दीन पूनाम्हा थेंब थेंब पानी गायीस्नी ढग नींघी ग्यात,वारावर उडी ग्यात!काल्दीन उनन्ही नको नको करी सोडं व्हतं. दिनभर उकयी ऱ्हायंत.डोकाले चटका बठी ऱ्हायंता.आंगन्हा घाम नींघी ऱ्हायंता.डोकावरना यायं मोठा व्हता.२१ जूनन्हा व्हता.सालन्हा बठास्थिन मोठा दिन व्हता.चटका देत मायनी याद दि, झिरीमिरी पानी गाई उडी ग्या.पुरा मिरीग कोल्ला खटक नींघी ग्या.मिरीगना शेवटला दिनल्हे.आथा तथा फवारा मारी, हाजेरी लायी नींघी ग्या.काल्दीन पानी आठे पूनालें हलका फुलका, नाचत वाजत उना, फवारा मारी नींघी ग्या.🌞          गावले कशा सें?निस्ता धुराळा उडी ऱ्हायना.मी परोनंदिन सनवारना दिन २० तारीखले, सक्कायम्हा धु्यातून मेहेरगांव, चिंचवारमार्गे लामकांनीवरतून *म्हसाळे* गावले गयतु.रंगतन्हा नातानं एक लगीन व्हतं.म्हसाळे पाच-सव हजार लोकसंख्यांनं गाव व्हयी.धुयातून म्हसाळे गावं ५२ किलोमीटर दूर सें.मी धुयातून लामकांनी एसटीवर बसनू. ...

येळकोट येळकोट जय मल्हार, आदेश सह्याद्री ट्रेकर्स

*यळकोट येळकोट जय मल्हार!* *कडेपठार ते जेजुरी ट्रेक एक अनुभूती* (आदेश सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप,हडपसर) 🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩 *************************** ... नानाभाऊ माळी                माणूस सतत स्वतःची शारीरिक कुवतीची तपासणी करीत असतो. दोर तुटेल इतकं ओढू नये,ताणू नये.आपल्या  शरीराचं देखील तसंच असतं.शरीराला अतिकरू नये पण झेपेल इतकं तरी शरीराला काम द्यायला हवं.साहस आत्मविश्वास,मनाची तयारी ही शरीराची बलस्थानं असतात.आम्ही आमच्या बलस्थानांची तपासणी करून घ्यायला आज रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी पहाटे ५ वाजता दुचाकीने हडपसरहून ५१ किलोमीटर लांब असलेल्या खंडोबाच्या जेजुरीला अन जयमल्हारच्या कडेपठारला गेलो होतो.हा ट्रेक नवीन अनुभूती देणारा ठरला.त्याविषयी मनातले बोल 🚩                ब्रह्मपहाट शुद्ध आचार विचारांना जन्म देत असते.शुद्ध विचारांना घेऊन हिंडत असते.शुद्ध प्राणवायू तिचा श्वास असतो, प्राण असतो. पहाट मोहक असते,प्रसन्न, उत्साही  असते.प्रत्येकाला आनंद, उल्हास भरत असते.जसं जसे उजाडत जातं, उठलेले गावं-शहरं व...

प्रतिभास्पर्शी मित्र संजय धनगव्हाळ

*प्रतिभास्पर्शी मित्र संजय धनगव्हाळ* 🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹 **************************** ... नानाभाऊ माळी             मैत्री कशी असावी?मित्र त्याच्या अंतःकरणाचे अबोल बोल मुखातून व्यक्त करणारा असावा, प्रसवणारा असावा.मैत्रीचं मूळ अन सुरुवात कशी होतें मग?मैत्री कधी बालपणाची असते.कधी शाळेतील असते.कधी पुढील शिक्षणातून होतें. कधी कुठेतरी भेटीत, गाडीत, एसटीत, प्रवासात कुठेही सार्वजनिक ठिकाणी भेटल्यावर होऊ शकते.कधी संबंधित ऑफिसमध्ये कामानिमित्त होतें.भेट होतें ओळख होतें. विचार जुळतात मैत्री होतें. पुढे मैत्री वृद्धिंगत होत जाते.कधी कुठल्यातरी समारंभात, कार्यक्रमानिमित्त ओळख होऊन मैत्रीत रूपांतर होतें.                आता अलीकडे मैत्रीचा परीघ खूप विस्तारला आहे.मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअप, इस्टाग्रामनें माणसं जवळ आणली आहेत. माणसं जोडली गेली तरीही या क्षेत्राने हृदय जिंकलं आहे का ?सोशल मेडियामुळे माणसं जवळ आली,जोडली गेली.आभासी मैत्रीत आंब्याचा, उसाचा, संत्रा,मोसंबी सारखा गोडवा असतो का मग?आपण जेवतोय,जिभेला चवचं नाही तसं आभासी माध्यम मैत...

वैशाखी वादळवारा कवी संमेलन -2026

*वैशाखी वादळ वारा काव्य संमेलनं २०२६* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 **************************** ... नानाभाऊ माळी                  सध्या धोंड्याचा महिना,अधिक जेष्ठ मास सुरु आहे.घरोघरी जावाई मुलगीचां सन्मान सुरु आहे.सर्वजन देवपून्य पदरात पाडून घेण्यासाठी श्रद्धेनें देवद्वारी नतमस्तक होत आहेत. पाहुण्यांच्या आदर सत्कारात मग्न आहेत. काही दिवसांपासून निसर्गाने आपला खेळ प्रारंभ केलेला दिसतोय.वादळ, वारे वहायला लागले आहेत.सोबतीला चटकेंदार उन आहे...खरंच या अद्भुत विशालकाय आकाश कुपीत काय काय दडलेलं असावं माहीत नाही!विश्वनिर्मात्याने या आकाशी विवरात, अद्भुत पोकळीत अनंत ग्रह तारे भरलेले असावेत.सर्वचं स्वतःचा तोल सांभाळून,अंतर ठेवून आकाशविवरात आपल्याचं नादात भ्रमण करीत आहेत.त्या भ्रमणकारी ग्रह-ताऱ्यांमध्ये पृथ्वी देखील असावी.विश्वनिर्मात्याने त्यावर प्राणवायू,पाणी उपलब्ध करून दिलं असावं.जीवांची निर्मिती झाली असावी.सगळं सगळं बदलून गेलेलं असावं.पृथ्वीच्या आशिया खंडात, भारतातील महाराष्ट्र भूमीत,प्राचीन काळापासून अनेक वादळं येऊन गेली असावीत.काही वादळं घोंगावत आहेत.शब्द हत...

सिंहासनाधीश्वरांचा राज्याभिषेक सोहळा

*सिंहासनाधिश्वर राजयभिषेक सोहळा*  (शिवनेरी तें रायगड स्वराज्याची लढाई) 🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩 *************************** ... नानाभाऊ माळी        आज छत्रपती शिवराय यांचा राज्याभिषेक सोहळा महामंगल दिवस त्या निमित्ताने.. 🚩    जेव्हा जेव्हा राजसत्तेचा दंभाचार, अनाचार,अत्याचार,अनाठाई शिगेला पोहचतो तेव्हा तेव्हा शोषित शक्तीचा अचानक असहनीय स्फोट होत असतो.स्फोट अतिभयंकर असतो. एकवटलेल्या शक्तीचा प्रतिकार असतो.महाभारतात सांगितल्याप्रमाणे जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा युगपुरुषाचां जन्म होत असतो.अधर्मीचां अस्त होत असतो.विनाश होत असतो. दबलेल्या आवाजाचा एकवटलेला प्रचंड स्फोट होत असतो.शोषितांचीं दैवी शक्ती उदयांस येत असतें.त्याचं वेळेस शोषक, अनाचारी,अत्याचारी असुरांचा नायनाट होत असतो,संहार होत असतो.असुरांच्या संहरासाठी श्रीहरीविष्णूसं अनेकदा जन्म घ्यावा लागला.श्रीमहादेवांनीं बोकाळलेल्या अनाचारी शक्तीचा शिवतांडवातून संहार केला होता.हे प्राचीन शीव-भागवत पुराण संदर्भ आहेत शोषितांच्या लढाईसाठी!माणसाला स्फूर्ती, शक्ती देणारे अध्यात्मिक शिवपुराण संदर्भ आहेत.हा अधर...

शिवनेरी किल्ला शक्तीस्थळ (आदेश सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप )

*शिवनेरी किल्ला शक्तीस्थळ*      🚩🚩🚩🙏🚩🚩🚩 (आदेश' सह्याद्री ट्रेकर्स,हडपसर) *************************** ... नानाभाऊ माळी                     तो काळ अत्याचारी राजसत्तेचा होता.अस्मानी सुलतानीचां होता!रयत जुलूम सहन करीत जगत होती.आया बहिणींची आब्रू लुटली जात होती.रक्षणास एखादा दैवी अवतार येईल या आशेवर लोकं जगत होती.एखादी विलक्षण शक्ती धावून येईल या आशेवर जगत होती. कुतूबशाही, आदिलशाही, निजामशाही, मोघलशाहीने सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात आहाकार माजवीला होता.उच्छाद मांडला होता.🚩              जेव्हा जेव्हा धर्मावर प्रचंड संकट येतं  तेव्हा दैवी अवताराचां जन्म होतं असतो.शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊंच्या पोटी आशाचं एका तेजस्वी सपुत्राचा जन्म झाला होता. पूर्व क्षितिजावर तेजस्वी सूर्य वर येत होता.शांत, शीतल, प्रसन्नता किल्ल्यावरील हिरवाईतं एकरूप झाली होती. शिवनेरी किल्ल्यावर सूर्यासम तेजस्वी सुपुत्र जन्माला आला होता. माता, पिता अन रयतेची वेदना, दुःखाचे मळभ काही अंशी कमी झाले होतें.चौफेर उं...