समाजसुधारकांच्या २६व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
*समाजसुधारकांच्या २६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ********************** ... नानाभाऊ माळी सूर्य दररोज उगवतो, जवळपास १२ तास प्रकाश देत मावळतीला निघून जातो.जीव जीवांना जीवन देणे हेचं उद्दात कार्य त्याचं आहे.तो कुठलाही मोबदला न घेता आपलं कर्तव्य बजावून दररोज मावळतीला निघून जातो. अर्थात सूर्य थांबला आहे आहे का? अजिबात नाही!!तो २४ तास अहव्यातपणे राबतो आहे.पृथ्वी गोल असल्यामुळे ती सूर्याभोवती २४तासात एक फेरा पूर्ण करते असं भौगोलिक कालमापकं सांगतात. पृथ्वीचं सूर्याभोंवतीचं फिरणं थांबलं आहे का? पृथ्वी थांबणारं तरी कशी? सर्व अनर्थ घडेल.पृथ्वीचा सूर्यभोवती फिरण्याचा समर्पित भाव जगातल्या कुठल्याही मोजमापात बसणार नाहीयें. एखाद उद्दात्त व्रत, हेतू स्विकारून जीवनभर त्यासाठी झटणे, कष्ट करणे,राबणे,कार्यास समर्पित होणे त्यासाठी साध्याची साधना कठीण असते.मानवी जन्म घेऊन पूज्य पदापर्यंतचां प्रवास महाकाठीण असतो.असे कित्येक महामानव या पृथ्वीतलावर होऊन गेलीत. या देशात होऊन गेलीत.या महाराष्ट्रात होऊन गेल...