Posts

अश्रू तलावात मला शोधतो आहे

अश्रू तलावात मला शोधतो आहे 🌹🙏🌹😢🌹🙏🌹🙏 ************************* ... नानाभाऊ माळी       'खाली पडल्याबरोबर गेलो असतो तर बरं झालं असतं!सगळ्या व्यापातून मुक्त झालो असतो!'... त्या व्यक्तीच्या 'त्या ' शब्दांनी डोळ्यात टचकन अश्रू आले होते!जीवन कसं असतं बघा ना!माणसं स्वतःविषयी असं बोलतांत तरी कसे? खरचं जगणं कठीण होऊन बसलयं का?........ काल दिवसभर तप्त उन असल्यानें घराबाहेर पडलो नव्हतो!संध्याकाळी सूर्यनारायण पश्चिम दिशेला टेकतं होता!स्वअस्तित्व घेऊन हळूहळू डोंगरापलीकडे निघाला होता!अंधार पांघरतांना पश्चिमेची तांबूस छटा पुसट होत चालली होती!सूर्य मावळल्यावर मी ही घराबाहेर पडलो होतो!मोकळं, हलकं वाटत होत!सिमेंटचे रस्ते अंगातली उष्णता बाहेर फेकीत होते!रस्त्याने चालतांना,हाताच्या मुठीत दुडूदूडू चालणाऱ्या साडेतीन वर्षाच्या नातूचा हात होता!त्याच्या मनोवेधक खट्याळ बाल लीला सुरूच होत्या!हळूहळू अर्धाएक फर्लांगं चाललो असेल!रस्त्यावरचं आमच्या जेष्ठ नागरिक संघांचे मित्र भेटले!त्यांच्याशी गप्पा मारत होतो!नातू बोट ओढून पुढे चालायचा प्रयत्न करीत होता!मी त्याचं मनगट धरलं होतं!रस्त्यात गर्द...

साहित्यिक सद्गुरू दर्शन

*साहित्यिक सद्गुरू दर्शन*  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री.रमेश आप्पासाहेब बोरसे सर *************************** ... नानाभाऊ माळी सध्या जग अनेक गुरूंच्या पाठीमागे लागलं आहे. त्यातील सद्गुरू किती?असा अवघड प्रश्न पडत असतो.सदगरू सदाचरणाचा मार्ग धरायला लावतात.समाजालां सतसंगतीचां मंत्र देत असतात.गुरु आपल्या शुद्धाचरणातून दुःखीतांच दुःख हलके होण्यासाठी धडपडत असतांत.मलाही साहित्यिक गुरु लाभलेत!गुरुवारी, दत्तगुरुंच्या वारी आदरणीय रमेश आप्पा बोरसे सर आपल्या घरी आले होते.त्यांच्याविषयीं काही अंतरीचे बोल..... 💐 जगातील सर्व *गुरु* ज्ञानजिज्ञासूंचें पोशिंदे असतात.ज्ञानाकलनाची उत्सुकता ज्यांना असते त्यांचे पाय आपोआप गुरूंकडे ओढ घेत असतात.आपल्या मनात घर करून बसलेल्या अज्ञानाची उकल गुरूंच्या अमोघ कृपेनें होत असते.ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जात असतं. सदगुरूंकडून मिळालेलं अनमोल जगदंकल्याण ज्ञान *संचित* करून ठेवल्यास शिदोरी रूपात आयुष्यभर थोडंथोडं सोबतीला ज्ञानउजेड देत राहतं. कुठल्याही जनसामान्य व्यक्तींनी देव कधी पाहिला आहे का हो?देवाचा स्पर्श कुणाला झाला आहे का?ते कार्य सद्गुरू करीत असतात. सद्गुरू देवा...

चला जाऊया गड-किल्ल्यांवर (वसईचा किल्ला भाग -०२

*चला जाऊया गड-किल्ल्यांवर*    (*वसई किल्ला,* जिल्हा पालघर)             (*भाग-०२*) 🚩🚩🚩🚩🪷🚩🚩🚩🚩 **************************** ... नानाभाऊ माळी                       आपल्या मनात कुतूहल,उत्सुकता दाटून आलेली असते.आपल्याला सतत निसर्ग आव्हानं देत असतो. आपणही त्यात कमी म्हणून की काय निसर्गावर मात करीत,आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचा प्रयत्न करीत असतो.निसर्गाचा समतोल बिघडवत निसर्गाचा ऱ्हास करीत असतो. निसर्गाचा अगम्य स्वभाव जिज्ञासेपोटी जाणून घेत असतो. निसर्गाच्या कुशीत वेरूळ, अजिंठा, अनंत किल्ले गढ्या प्राचीन निर्मितीच्या खाणाखुणा घेऊन उभ्या आहेत.मतं मतांतंरामुळेचं काहीजन ,'गढी,किल्ले, जलदुर्ग या शापित वास्तू आहेत!'असं मानतात. तर,'किल्ले हें शौर्यस्थळं आहेत!विजय स्थळं आहेत.विरश्रीची गौरव स्थळं आहेत.ऊर्जा, शक्ती, हिम्मत, ताकद, प्रोत्साहन, महत्वाकांक्षा देणारे गौरवी विजयस्थळं आहेत ' अशी दुसरीं मतं देखील आहेत.मत मतांतर असणारंच.शापित यासाठी बोललं जातं की त्या,' वास्तूंमध्ये रक्ताचे पाट वाहिले आहेत.राज्य...

चला जाऊया गड -किल्ल्यांवर (वसई, अर्नाळा किल्ला जि पालघर )

*चला जाऊया गड-किल्ल्यांवर* (वसई,अर्नाळा किल्ले,जि.पालघर)                  (भाग-०१) 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 **************************** ... नानाभाऊ माळी                      एका दिवसात दोन किल्ल्यांवर चढाई?तेही मुबंई पार करून पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात? पुण्याहून २१० किलोमीटर लांब जाऊन पुन्हा २१० किलोमीटर परत येणे!घामात चिंबचिंब भिजणे!समुद्रातील खारट पाण्यासहित जिकडे तिकडे फक्त माशांचाचं वास नाकांच्या दोन छिद्र्यातून आत धडकणे!समुद्रात बोटीतून चढ-उतर करतांना होणारी दमच्छाक,परीक्षा!गुडघाभर पाण्यात पुढे जाऊन बोट पकडून,गर्दीत जागा पकडणे!हा नकोसा तरीही हवाहवासा वाटणारां साहसी प्रवास!हृदयाला भावला हो! समोर अथांग समुद्र पहुडलेला!जिकडे तिकडे फक्त पाणीच पाणी दिसतंय!किनाऱ्यावर कोळी बांधवानी आडव्या उभ्या लाकडी दांड्यांवर वाळायला ठेवलेली मासळी, सुकट, बोंबील!माशांचे भिन्न प्रकार,त्यांचां नाकाला येणारा भिन्न उग्र वास!अशी साहसी दर्यावर्दी सफर स्वप्नात तरी पाहाता येईल का?प्रत्यक्षात अनुभवनं थोर भाग्य असत...

कानिफनाथ गड कष्टाचा देव भाग -४४

*कानिफनाथ गड कष्टाचा देव*                (भाग-४४) 🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩 **************************** ... नानाभाऊ माळी नेहमीचंच ठिकाण तें  दिसती डोंगर दऱ्या   चालतांना दम लागतो अमुच्या अनुभूती खऱ्या!🌹 दगड-धोंडे आडवे उभे असते ठेचकाळण्याची भीती पहाट अंधारी ऊर्जेतून   वाढवीत असतें गती!🌹 वेडीवाकडे वळणं येती चढ अंगावरती घेतो पहाट गारवा सखा सोबती  आम्हा शिखरावरती नेतो!🌹 शिखर दिसतं स्वर्गासमान  आम्ही शरण त्यांसी जातो  श्रमघामाचं जिंकणं असत  श्रद्धेला डोळे भरुनि पाहतो!🌹  धमनीत श्वास भरुनि जिंकत जावे डोंगर साहस अमृत बनूनी होतं संजीवनी सागर..!🌹                          आत्मविश्वासातून साहसाची मशाल पेटवायची असते.मशाल आत्मभान देत असते.उजेड देत असते.मनात जिंकण्याची उर्मी जन्माला घालीत असते.अंधारावर विजय मिळविणारी मशाल नेतृत्व देत असते.कधी लढ म्हणून सांगत असते.मशाल समूहाची प्रतिनिधी असते.तशीच मशाल काळजाची पेटवायची असते. काळजात पेटलेली मशाल अनेक दिव्य प...

कौटुंबिक मेळावा अन विध्यार्थी गुणगौरव

कौटुंबिक मेळावा अन विद्यार्थी गुणगौरव 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ************************ ... नानाभाऊ माळी मेळावे अनेकांचे असतात!अनेक उद्दिष्टांसाठी भरवले जात असतात!सामाजिक,राजकीय, कामगार, सामाजिक संघटना, धार्मिक, अन जाती न्यातींचे मेळावे घेतले जात असतात!मेळाव्यातून नातं घट्ट होऊ लागतं!मेळाव्यातून मंथन होतं असतं!हिताचे निर्णय घेतले जात असतात!मेळाव्यातून माणसं जोडली जातात!संघटन मजबूत होऊ लागतं!अशाचं एका कौटुंबिक मेळाव्याविषयीं!....              नोकरी व्यवसायामुळे मोठया प्रमाणावर स्थलांतर होत आहे!गावं-खेडी शुकशूकाट होत आहेत!पाऊस पाट दाखवून पळून जात असल्याने शेती करणं कठीण झालं आहे!शेतमजुरी देखील अवघड झाली आहे!लहान शहरं मोठया शहराकडे ओढली जाऊ लागली आहेत!महानगरं फुगत चालली आहेत!गावाकडचा लोंढा शहराकडे वळतो आहे!गाव खेड्यातील अनेक  बांधव पोटासाठी मोठया शहरात येऊन कष्ट करतांना दिसत आहेत!गाव शरीराने दूर झाली असली तरी मनाने झाली नाहीत!जन्म ठिकाणं कोण बरं विसरेल?सुट्टी काढून सणासुदीला,दिवाळीला काही दिवस गावाकडे राहून गावपण अनुभवायचं!सुखाचा,आनंदाचा क्षण उपभोगायचा!सण सा...

आखाजी

*।।आखाजी।।..भाग* ०२रा)  🌹----------------🌹 *.....नानाभाऊ माळी*  भाऊ-बहिनीस्वन!  *आखाजीन्या!...नवा सालन्या!.. बठ्ठा* *खान्देशी भाऊ-बहिनलें!मामा-काका,चुलता* *!* *आजला-आजलीस्ले!..मन्ह्या* *हिरदयथिन हार्दिक शुभेच्छा!आवंनं* *साल बठ्ठास्ले आबादानीनं* *जावो हाईचं गवराई मायनां पायवर डोक ठेयी प्रार्थना* *करस!*  भाऊ-बहिणीस्वन! खान्देशना सननी वयख आखाजी से!तीअक्षयतृतीया से!त्रेतायुगनी सुरुवातच आखाजी से!खान्देशनं नवं साल आखाजीचं से!गवराई म्हणजे पारबती माय से!संकर भगवान तिन्हघरनां मानोस से!घर-घरमा नवरा-बायकोना जोडा...संकर पारबतीनं रूप से!गवराई माहेरलें येस!आनंदम्हा माय-बापनाकडे!माहेरलें!..आंडेर येस!आखो थकवा काढी  सासरले चालनी जास!  *आंडेर हायी गवराई से!म्हणीसनी आखाजी*   *खान्देशनी वयख से!खान्देशनं नवं* *साल से!लागता वैशाखलें* *आखाजी यी जास!ती गवराई मायनी* *वयख से!आंडेर-बेटीनी* *आखाजी से!शंकर भगवाननी* *पारबतीलें माहेरलें धाड व्हत!तव्हय* *फाईन आंडरी माहेरलें येयी* *ऱ्हायण्यात!..तव्हयस्नि हायी* *रीत पडी जायेल से!आखाजी* *लागी जास!नवं साल लागी जास!घर- घर हारकी जास...